शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मुंबई मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील पानपट्टीचालकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:57 IST

कोल्हापूर : राज्यातील पानपट्टीचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबईत आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो पानपट्टीचालकांनी सहभाग घेतला. जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली पानपट्टीचालक मोर्चाला गेले होते.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तंबाखूजन्य वस्तू व खाद्य वस्तू (पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस् आदी) एकाच ठिकाणी विकण्यास परवानगी देऊ नये, तसेच तंबाखूजन्य वस्तूंच्या ...

ठळक मुद्देखाद्य वस्तू विक्रीस परवानगी देण्याची मागणी जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र परवाना प्रणाली लागू करावी,

कोल्हापूर : राज्यातील पानपट्टीचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबईत आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो पानपट्टीचालकांनी सहभाग घेतला. जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली पानपट्टीचालक मोर्चाला गेले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तंबाखूजन्य वस्तू व खाद्य वस्तू (पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस् आदी) एकाच ठिकाणी विकण्यास परवानगी देऊ नये, तसेच तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र परवाना प्रणाली लागू करावी, अशा लेखी सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या. या सूचनेचा विपरित परिणाम शहरासह ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या दुकानदारांवर/किरकोळ विक्रेत्यांवर होणार आहे. शिवाय तंबाखूजन्य वस्तूच्या दुकानातून पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस्, चिप्स, कोल्ड्रिंग्ज आदी वस्तूंच्या विक्रीस प्रतिबंध केल्यास त्यांना केवळ तंबाखू व तंबाखूजन्य वस्तुंच्या विक्रीतून मिळणाºया उत्पन्नावर अवलंबून राहावे लागेल.

ते कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी पुरेसे नाही, असे मत पानपट्टीचालकांचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सूचनेचा विचार करू नये, अशी मागणी पानपट्टीचालकांची आहे.दरम्यान, गुटखा बंदी करतेवेळी राज्यातील सर्व पानपट्टीधारकांनी याचे स्वागत केले. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने पानपट्टीचालकांना गुटख्याच्या बदल्यात इतर वस्तू विक्रीला परवानगी देतो, असे सांगितले होते. कालांतराने सुगंधी तंबाखूवर सरकारने बंदी घातली. त्यातच आता खाद्य वस्तू पानपट्टीत विकण्यावर बंदी केली. त्यामुळे पानपट्टी व्यवसाय धोक्यात आला असल्याचे मत पानपट्टीचालकांनी व्यक्त केले. मोर्चासाठी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाो शिंदे, विनायक घळसासी, उमेश ठोंबरे, वायचळ, आदी पानपट्टीचालक गेले होते.पानपट्टीचालक दृष्टिक्षेपात...(कोल्हापूर जिल्हा)  ५५०० -कोल्हापूर जिल्हा  ७५०-कोल्हापूर शहरमागण्या...१तंबाखू व तंबाखुजन्य वस्तू उत्पादन, वितरण साठा या संदर्भात केंद्र सरकारने बनविलेल्या ‘कोटपा’ कायद्याचा फेरविचार करावा२तंबाखू व तंबाखूजन्य वस्तू विक्रीच्या दुकानांत पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस्, चिप्स, कोल्ड्रिंग्ज आदी वस्तुंची विक्री करू नये, या केंद्र सरकारने केलेल्या सूचनेचा राज्य सरकारच्यावतीने विचार केला जाऊ नये.  ३तंबाखू वस्तू विक्रीसाठी परवाना असावा, परंतु स्वतंत्र परवाना असावा, अशी घातली जाणारी अट रद्द करण्यात यावी. 

पानपट्टीचालकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची लवकरच भेट घेऊन हा प्रश्न मांडणार आहे. १ जानेवारी २०१८ पासून पानपट्टीत खाद्य वस्तूची विक्री करू नये, असे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे सर्व पानपट्टीचालक अखेरपर्यंत याप्रश्नी लढा देतील.-अरुण सावंत, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन.